डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2024 8:57 AM | Dharashiv

printer

धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव

धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरदास यांनी आपल्या मार्गदर्शनातून टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंचांचे आभार व्यक्त केले. तसंच सर्व सरपंचांनी निक्षय मित्र म्हणून, उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा