व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या मौजे वालोपे इथं ४ जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन किलो अंबरग्रीस आणि दोन दुचाकी वाहनं जप्त केली आहेत.
दोन आरोपी मंडणगड तालुक्यातले, तर दोन आरोपी दापोली तालुक्यातले आहेत. या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअतर्गत कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. व्हेल माशाच्या उलटीला अंबरग्रीस म्हटलं जातं. सुगंधी उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक म्हणून तिचा वापर होत असल्यानं तिला मोठी किंमत असते.