डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पिंपरी चिंचवड, पनवेल, सातारा शहरांना माझी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार

राज्यात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई द्वितीय तर ठाणे महानगरपालिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसंच भूमी थीमॅटिक कॅटेगिरीत नवी मुंबई महानगरपालिका राज्यात सर्वोत्तम ठरली आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात पनवेल महानगरपालिकेने प्रथम, अहमदनगर द्वितीय तर धुळे महानगरपलिकेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गटात सोलापूर महानगरपालिकेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या गटात सातारा नगर परिषद पहिली, यवतमाळ दुसरी तर इचलकरंजी तिसरी आली आहे. 

नगरपरिषद आणि नगरपंचायत गटात बारामतीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हिंगोली आणि पंढरपूरने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसंच लोणावळा नगरपरिषदेनं उत्तेजणार्थ क्रमांक पटकावला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा