डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये संत्संगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. २८ जण  गंभीर जखमी असून त्यांच्यावर आगरा, अलिगढ आणि हाथरसमध्ये विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हाथरस जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी हा सत्संग आयोजित करणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक बाबाच्या शोधासाठी मैनपुरी जिल्ह्यातल्या राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टवर काल रात्री छापे टाकले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा