डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचं उपलजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

कोल्हापुरात विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानं उपलजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याविषयीचं निवेदन त्यांना सादर केलं. विशाळगडावरच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्‍न समोपचारानं सुटणं शक्य असतानाही, षडयंत्र करून मुस्लिम वस्तीला लक्ष्य केलं गेलं, इथल्या मशि‍दीवर झालेला हल्ल्यानं मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून तो दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

 

हिंसाचाराची ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना अशोभनीय आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, हिंसाचारातल्या पिडितांना नुकसान भरपाई मिळावी, आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी असं या निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा